नमो बुद्धाय - जय भीम,
आम्ही दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाच्या संदर्भामध्ये काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये,
आम्ही आमच्या पद्धतीने फिरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तेव्हा काही बाबी प्रामुख्याने लक्षात आल्या त्या पुढील प्रमाणे,
1. बौद्धांची अस्मिता महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात,
2. दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात असून सुद्धा दीक्षाभूमी स्मारक समिती बौद्धांच्या हितासाठी काहीही पाऊल उचलत नाही, एकंदरीत दीक्षाभूमी धोक्यात आहे. असा आमचा दावा आहे.
3. भीमा कोरेगाव विजयस्तंभ जो आपला गौरवशाली इतिहास सांगतो,तो विजयस्तंभ सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे, त्या संदर्भात कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे.
4. तळेगाव दाभाडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर आहे व तिथे विहार सुद्धा आहे ते सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे.
5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर मध्यप्रदेश सरकार व तेथील स्मारक समिती यामध्ये वाद आहे.
6. सम्राट अशोकाच्या काळातील 84 हजार बौद्ध विहारे दिसून येत नाही.
7. सम्राट अशोकाच्या काळात बांधलेल्या आमच्या लेण्या उध्वस्त करून तिथे मंदिराच्या उभारण्या होत आहे.
8. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धार्मिक संस्था,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये मतभेद,
9. सामाजिक संघटन समता सैनिक दलाचे अलग अलग पडलेले गट,
10. राजकिय संस्था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये पडलेले गट,
11. शैक्षणिक संस्था पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये असलेला वाद,
12. आमचे स्मारके धोक्यात, आमच्या लेण्या धोक्यात, आमचे विहार धोक्यात,
आमचे धार्मिक संघटन, सामाजिक संघटन, राजकिय संघटन,
शैक्षणिक संगठन यात लागलेले वाद त्याची कारणे व उपाय यावर सारासार विचार करून आम्ही एका निष्कर्षावर आलो कि,
आमचे म्हणजे बौद्धांचे एकंदरीत अस्तित्व धोक्यात आहे,
म्हणजे आपली बौद्ध विरासतच धोक्यात आहे, असा आमचा दावा आहे
त्यामुळे आम्ही आता बौद्ध विरासत बचाओ फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील वाटचाल करण्याचे ठरविले आहे.
बौद्ध विरासत बचाओ फाऊंडेशन ही एक रजिस्टर संस्था असून
दीक्षाभूमि स्मारक बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही उणीवा आम्हाला काम करताना जाणवत होत्या,
त्या सर्व या रजिस्टर संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहो.
आम्ही सर्व आमचे ध्येय धोरण उद्दिष्टे काम करण्याची पद्धत सर्वच्या सर्व सार्वजनिक करत आहो....
बौद्ध विरासत बचाओ फाऊंडेशन हे एक कायमस्वरूपी धार्मिक संघटन असेल,
या संस्थेतील पदाधिकारी कधीच कोणत्याही राजकिय पक्षाचा पदाधिकारी बनणार नाही किवा कोणत्याही राजकिय पक्षाचा निवडणुकीत प्रचार करणार नाही...